Chhatrapati Rajaram Maharaj By V C Bendre छत्रपती राजाराम महाराज
Chhatrapati Rajaram Maharaj By V C Bendre छत्रपती राजाराम महाराज
Couldn't load pickup availability
Chhatrapati Rajaram Maharaj छत्रपती राजाराममहाराज By V C Bendre
छत्रपती संभाजी महाराजांना वीरमरण आल तेव्हा राजाराम महाराज उण्यापुर्या १९ वर्षाचे होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूमुळे मराठ्यांच्या गोटात जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली तिचा गुंता महाराणी येसुबाई सरकारांच्या विवेकबुध्दीने सुटला. हिंदवी स्वराज्याचा भार खांद्यावर घेऊन राजाराम महाराजांना राजधानी रायगड सोडून दूर दक्षिणेत जिंजी इथ राजधानी निर्माण करावी लागली. युध्दसन्मुख छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू, रायगडाचा पाडाव, येसुराणी सरकार आणि बाल शाहूंची अटक, शिरजोर झालेले मुघल, जिंजीसारख्या स्वराज्यातल्याच पण नवख्या मुलुखात घ्यावा लागलेला आसरा अशा सगळ्या वादळी वातावरणात स्वराज्याची धुरा सांभाळण खचितच अवघड कार्य होत. राजाराम महाराजांनी त्यांच्या छोट्या पण अत्यंत महत्वाच्या कारकिर्दीत स्वराज्याची धुरा अत्यंत चिवटपणे सांभाळली.
Share
