Kashmir Tevha Ani Ata 370 Nantarchi Navi Pahat by Jayashri Desai काश्मीर तेव्हा आणि आता
Kashmir Tevha Ani Ata 370 Nantarchi Navi Pahat by Jayashri Desai काश्मीर तेव्हा आणि आता
Couldn't load pickup availability
हे पुस्तक म्हणजे एक कवडसा आहे, कलम ३७० काढल्यानंतरच्या काश्मीरचा... ज्या काश्मीरने प्रदीर्घ काळ हिंसाचार सोसला... दहशतवादाची होरपळ सोसली... अशांतता सहन केली... ज्या काश्मीरमधलं जनजीवन संगिनींच्या टोकावर तोललं गेलं होतं... चार भिंतीच्या आत कोंडलं गेलं होतं, त्या काश्मीरमध्ये आता काश्मीरला विशेष दर्जा देणारं ३७० कलम रद्द झाल्यानंतर काय परिस्थिती आहे, तिथे कोणते वारे वाहत आहेत, तिथलं जनजीवन आता कसं आहे, तिथे कोणते वारे वाहत आहेत, तिथलं जनजीवन आता कसं आहे, तिथे विकासाच्या कोणत्या पाऊलखुणा दिसत आहेत असे अनेक प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात येत असतील. त्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. काश्मीर हा सगळ्यांच्याच अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि बातम्यांमधून आताच्या काश्मीरबाबत फार काही आपल्यापर्यंत पोहोचतंय असं नाही. त्यामुळेच असेल कदाचित पण आजही काश्मीर म्हटलं की तिथली दगडफेक, हिंसाचार, बॉम्बस्फोट हेच अनेकांच्या डोळ्यांसमोर आधी येतं आणि मग तिथे जायची त्यांना भीती वाटते. पण सुदैवाने आता तिथे ती परिस्थिती नाही. ३७० काढल्यानंतर आज काश्मीर मोकळा श्वास घेतो आहे. नवी पहाट अनुभवतो आहे, सावरतो आहे. हे आम्ही स्वत: अनुभवलं. त्या अनुभवांचं शब्दरूप म्हणाजेच हे पुस्तक !
ISBN : 9788195621033
Share
