Swatantrya Bhaskar (स्वातंत्र्य भास्कर)
Swatantrya Bhaskar (स्वातंत्र्य भास्कर)
Couldn't load pickup availability
‘स्वातंत्र्य भास्कर’ ही १८५७ सालातील ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यसंग्रामात उडी मारलेल्या नरगुंद नरेशांची कहाणी. भास्करराव यांचा उल्लेख ऐतिहासिक दस्तऐवजात ‘बाबासाहेब’ असाही केला जातो. ते भावे घराण्याचे एक नरमणी. १८५७च्या स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी ते नरगुंदचे अधिपती होते. मरहट्टा असलेल्या या स्वातंत्र्यसेनानीविषयी सर्वसामान्य महाराष्ट्राला फार त्रोटक माहिती आहे. राज्यपद तारूण्यात येत असतानाच त्यावर ब्रिटिशांनी घाला घातला.
ही कहाणी लिहिताना लेखकाच्या वर्णनाची शैली अशी आहे की प्रत्येक प्रसंग चित्ररूपाने ‘फ्रेम टू फ्रेम’ म्हणता येईल अशा पद्धतीने डोळ्यासमोर उभा राहतो आणि पात्रांबरोबरच आपणही नरगुंदचा राजवाडा, व्यंकटेशाचे मंदिर, मलप्रभा नदीचा तीर, राने-वने, नेपाळचा प्रदेश येथे भटकतो. ही भटकंती करताना वसई आणि भायखळ्यालाही येऊन पोहोचतो. या भास्कराच्या तेजाचा परिचय करून दिल्याबद्दल श्री. अरविंद हेब्बार यांचे शतशः धन्यवाद!
– डॉ. मधुमंजिरी गटणे.
Share
